मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.
महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.
रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना 'महात्मा' (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली.
भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.